Tuesday, December 23, 2008

बाष्कळ बडबडीचे पेव

विविध विषयांवर परिसंवाद, चर्चा, व्याख्यान होणेे हे त्या शहरातील सांस्कृतिक चळवळ सशक्त असल्याचे द्योतक आहे, परंतु कंपुशाहींनी एकत्र येऊन या व्यासपीठाला कालबाह्य पोथीनिष्ठ विचारांचा धोबीघाट करणे याला सांस्कृतिक चळवळ म्हणत नाहीत. गेल्या पाव शतकात ज्यांना वेगळे काही बोलताच आले नाही आणि "आता उरलो पत्रकापुरता' अशी ज्यांची अवस्था आहे, अशांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्यांनी तरी विचार करायला हवा होता. एखाद्याने व्यासपीठाचा दुरूपयोग केला तर समजण्यासारखे आहे, पण व्यासपीठाचा दुरूपयोग करण्यासाठीच कुख्यात असलेल्यांना निमंत्रित केले जाते तेव्हा या कार्यक्रमातून सोडल्या गेलेल्या विषारी फुत्काराबद्दल संयोजकांनाही जबाबदार धरले पाहिजे. सोलापुरात गेल्या आठवड्यात झालेले दोन कार्यक्रम असे संतापजनक होते. देशापुढे आज दहशतवादाचे मोठे संकट आहे. हे संकट मुस्लिम धर्मीयांमुळे आहे हे दहशतवादाचे चटके बसलेल्या प्रत्येक देशात दिसले आहे. भारत देश म्हणजे तर या दहशतवाद्यांना सुपीक जमीन वाटते. संसद, मंदिर, लोकल, रुग्णालये, बाजारपेठा अशा सर्व ठिकाणी आरामात बॉंबस्फोट झाले. अतिरेकी पकडायचे म्हटले तर हैद्राबादेत मुस्लिम वस्तीत न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना आदेश आहे. बटाला हाऊस चकमकीनंतर अतिरेक्यांचा उमाळा किती जणांना आला होता ते दिसलेच. असा एकच चेहरा सतत समोर येऊन अडचण होऊ लागली. मग साध्वी प्रज्ञा यांच्या चोरीला गेलेल्या मोटरसायकलीवरून एकदम हिंदू दहशतवाद शब्द रूढ झाला. मुख्य प्रश्नाला बगल देऊन हिंदू धर्माभिम्यांना बदनाम करण्यात ज्यांची हयात गेली त्याच मंडळींना त्यांचे वांझोटे विचार मांडण्यासाठी निमंत्रित करणे हीच चूक होती. त्यांनी येथे येऊन तंगडे वर करणे ओघाने आलेच.
त्या दोन कार्यक्रमांपैकी एका कार्यक्रमास बी.जी. कोळसे आणि राम पुनियानी उपस्थित होते. नागपूर येथील संघ कार्यालयावर अतिरेक्यांनी अयशस्वी हल्ला केला होता. तो अतिरेक्यांचा हल्ला होता हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे, पण माजी न्यायमूर्ती असलेल्या बी.जी. कोळसे यांनी नागपूरला पळत जाऊन काही तासांत निष्कर्ष काढला की, चकमक बनावट होती. ही संघ स्वयंसेवकांचीच चाल होती. या माजी न्यायमूर्तीची न्यायबुद्धी किती नि:पक्षपाती आहे ते दिसते. 1975 च्या मानवत हत्याकांडाच्यावेळी हे महाशय आरोपींचे वकील होते. त्यावेळी सविस्तर बातमी देण्यासाठी ते तरुण भारत कार्यालयात तासन्‌तास बसत होते. परभणीहून शंभर फोन करीत होते. हे संघाचे दैनिक त्यांना वैयक्तिक प्रसिद्धीसाठी चालले. नागपूर घटनेबाबतचे त्यांचे निष्कर्ष हेही सवंग प्रसिद्धीसाठी होते अशी ही प्रसिद्धीलोलुप मंडळी, दुगाण्या झाडूनच लक्ष वेधून घेणारी. दुसरे प्रसिद्ध विचारवंत राम पुनियानी. विनोदी लेखक वि.आ.बुवा यांनी जगप्रसिद्ध माणसाची व्याख्या एके ठिकाणी सांगितली. जो गल्लीतल्या लोकांनाही माहीत नसतो त्याला जगप्रसिद्ध म्हणतात. हे पुनियानी असे जगप्रसिद्ध आहेत.
त्यांच्या नावात राम असला तरी ते कोणत्या धर्माचे आहेत हे माहीत नाही. मुस्लिम जनसमुदायापुढे हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत, याची टिंगल करायची आणि उपस्थित मुस्लिमांनी त्यावर हसायचे हा सारा संतापजनक प्रकार आहे. या पुनियानी महाशयाची अक्कल किती ते कळाले. 33 कोटी हे संख्यावाचक की गुणवाचक यावरील नवे संशोधन डोळ्याखाली घालून मग एकेश्वरीपंथाचा उदोउदो करावा. हिंदू धर्मातील 33 कोटी देवांच्या संख्येचा उपहास करणाऱ्यांनी एक तरी पंथ एकेश्वरी आहे का याचा विचार करावा. पुनियानीसारख्या भंपक माणसाच्या वक्तव्यावर हसणाऱ्या मुस्लिमांनी आत्मनिरीक्षण करावे. अजमेरचा ख्वाजा मोईनुद्दिन दर्गा, हैद्राचा दर्गा, हाजी मंलग, प्रतापगडाजवळ कथित सुफी संत अफझलखान याचा दर्गा असे वेगवेगळ्या नावाचे हजारो दर्गे या देशात आहेत. त्या दर्ग्यांना वेगवेगळी नावे असलेली चालतात तर दत्ताचे देऊळ, गणपतीचे देऊळ, विठोबाचे देऊळ, अशी विविध नावांची देवळे असली तर त्यात दात विचकायला काय झाले? हिंदू धर्म हजारो वर्षांपूर्वीचा आहे तर इतर 1500-1600 वर्षांपूर्वीचे आहेत. एवढ्या शतकानंतर प्रत्येक धर्मात काही हास्यास्पद गोष्टी दिसतात.बिनडोक वक्तव्यावर हसण्यापूर्वी आपल्याही धर्मात इतरांनी हसण्याजोगे खूप आहे याचे भान ठेवावे. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने वार्तालाप ठेवताना निमंत्रिताची लायकी थोडी तरी जाणून घेणे आवश्यक आहे. सीमेवर युद्धाचे ढग जमत असताना बंधूभाव वाहवण्याऐवजी धार्मिक विद्वेष वाढवणाऱ्या अशा वक्तव्याची पोलीस आयुक्त दखल घेणार का?
दुसरा "सांस्कृतिक' कार्यक्रम ज्ञानप्रबोधिनीच्या प्रतिष्ठित सभागृहात झाला. श्री राधादामोदर प्रतिष्ठान अंतर्गत संतविद्या प्रबोधिनी हे आयोजक होते. विषय काय तर ""हिंदू विचार देशहिताचा आहे का?'' देशहिताचाच विचार होता तर पाकिस्तानशी युद्ध छेडावे का अशी चर्चा ठेवली असती तर पाप लागले नसते. हे हिंदूराष्ट्र आहे म्हणूनच परिसंवादाला हा विषय घेता आला याचे भान परिसंवादातील वक्त्यांनी ठेवायला पाहिजे होते. पाकिस्तानात अहमदिया, इराणमध्ये बहाई, झोरोस्ट्रियन, इंग्लंडमध्ये प्रॉटेस्टंट यांचे झाले ते हिंदुस्थानात झाले नाही. हिंदू धर्मावर दुगाण्या झाडल्यावर चाबकाचे फटके न बसता विचारवंत म्हणून मिरवता येते हीच हिंदू धर्माची थोरवी आहे. ईदला विजापूरच्या टिपू सुलतान चौकात पाकिस्तानी झेंडे लागले आणि ते काढायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला ही बातमी ज्यांच्या गावी नाही, गोहत्याबंदीचा कायदा असताना आपल्या गावात त्यादिवशी काय झाले हे माहीत नसलेल्यांचे बोलणे एकांगी न झाल्यास नवल ठरेल. 60 वर्षांचा "विवेक' सुदृढ आणि साठीची "साधना' मरणासन्न अवस्थेत, हे कशामुळे झाले ते न कळल्याने मनुस्मृती चघळणे ओघाने आलेच. मनुस्मृतीमुळे देशाचे नुकसान झाले म्हणणाऱ्या विचारवंताला किती मनू आहेत आणि किती स्मृती आहे याचे ज्ञान आहे का? कसलाही अभ्यास नाही, मार्क्सच्या पोथीसारखे लोकांनी फेकून दिलेले कालबाह्य, जुनाट, झिजलेले विचार ऐकण्यासाठी हा परिसंवाद होता का? हिंदू धर्माची अशी एकांगी पक्षपाती चिकित्सा करणाऱ्या कार्यक्रमाला ज्ञानप्रबोधिनीचे सभागृह लाभावे हे आमचे
दुर्दैव आहे.

No comments:

Post a Comment

....


मी एक पत्रकार आहे. आज प्रसारमाध्यमे केवळ व्यावसायीक बनली आहेत; आणि पत्रकारही. परिणामी या राष्ट्रासमोरील समस्या यथार्थपणे समाजासमोर आणल्या जात नाहीत. भारतीय समाज हा हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणानंतरही टिकून राहिला याला कारण आहे या देशाचा जीवनप्रवाह अर्थात हिंदुत्व.

स्वामी विवेकानंद म्हणतात हिन्दुत्व या देशाचा आत्मा आहे. प्राण आहे. हिंदुत्वाची जीवनधारा ज्या भागात कमकुवत झाली तो भाग या भारतवर्षापासून तुटला, हे एक कटु सत्य आहे.

विख्यात जागतिक इतिहासकार अर्नाल्ड तोयान्बी म्हणतात, "जीवनात आव्हानांचे भारी महत्व असते. जीवनात आव्हाने नसतील तर मनुष्य निष्क्रीय बनत जातो आणि शेवटी तो नष्ट होतो. परन्तु व्यक्तीच्या जीवनात आव्हाने असतील तर पुढील दोन पैकी एक गोष्ट होऊ शकते...

i. आव्हाने समजुन घेतली नाही तर त्या आव्हानान्ना बळी पडून नष्ट व्हावे लागते.

किंवा

ii. आव्हाने समजुन घेवून त्यांना प्रतिसाद दिला तर त्यातून मनुष्याचा विकास होतो.''

जी गोष्ट मनुष्याला लागु पड़ते तीच समाजाला आणि राष्ट्रालाही लागु पड़ते.

या राष्ट्राची जीवनधारा खंडीत करण्याचे प्रयत्न परकीय आणि भोगवादी विचारांवर पोसलेल्या स्वाकियांकडून मुजोरपणाने सुरु आहेत. ख्रिस्ती मिशनरी अनेक मार्गाने हिन्दू धर्माचे लचके तोडून येथील सहिष्णु जीवन प्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इस्लामी आतंक हा अतिरेकी, घुसखोरी आणि प्रचंड जननदर या माध्यमातून या राष्ट्राला ग्रासत आहे. हिन्दुन्मधे न्यूनगंड निर्माण करण्याचे प्रयत्न तथाकथित धर्मनिरपेक्षवादी (दुर्) बुद्धिवादी करीत आहेत. त्यामुले या समाजासमोरिल आणि राष्ट्रासमोरील आव्हनांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करीत आहे. आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.

...... सिद्धाराम भै. पाटील