Tuesday, December 16, 2008

दुसरी धूळफेक

देशावर झालेल्या हल्ल्याबाबत हे निकम्मे सरकार जशी धूळफेक करीत आहे तशीच 22 जुलैच्या लोकशाहीवरील हल्ल्याबाबत सत्यशोधन न करता पुन्हा धूळफेक करून प्रकरण दाबले आहे। खासदारांना लाच देण्याचा जो प्रकार झाला त्याच्या चौकशीस 5 महिने का लागावेत? समितीचे अध्यक्ष किशोरचंद्र देव हे कॉंग्रेसचे खासदार व माजी मंत्री. कॉंग्रेस पक्षावरील सोनिया गांधी यांची पकड लक्षात घेता त्यांचे चिटणीस अहमद पटेल यांना दोषी म्हणण्याची हिंमत किशोरचंद्र यांच्याकडे नव्हती, तसेच झाले. व्ही. जॉर्ज यांच्याप्रमाणेच लफड्यात अडकवलेल्या पटेलना सोडायचे म्हणून अमरसिंह यांना सोडले. शिवाय त्यांचा समाजवादी पक्ष सध्या कॉंग्रेसचा दोस्त आहे. दोस्ताला कसे दुखवायचे? असा हा राजकीय सोयीने बनवलेला अहवाल आहे. गोध्रा प्रकरणानंतर लालूंनी नेमलेल्या बॅनर्जी आयोगाने जसा लालूंना हवा तसा अहवाल दिला तसाच किशोरचंद्र यांनी सोनिया गांधी यांना हवा तस्सा अहवाल दिला आहे. 5 महिने आणि 600 पाने ही निव्वळ धूळफेक आहे. भाजपाचे विजयकुमार मल्होत्रा आणि मार्क्सवादी मोहमंद सलीम यांनी वेगळी मतपत्रिका जोडली, ती प्रसिद्ध झाली पाहिजे. 26 नोव्हेंबरचा मुंबईतील हल्ला आणि 22 जुलैचा लोकशाहीवर हल्ला या दोन्ही प्रकरणी सरकारने झकास धूळफेक केली आहे.22 जुलैच्या प्रकारासंदर्भात पत्रकार राजदीप सरदेसाई यांची भूमिकाही संशयास्पद आहे. 22 जुलैच्या पैसे व्यवहाराचे गुप्त चित्रण करून ते प्रक्षेपित करण्याचे त्यांनी मान्य केले होते. मग ऐनवेळी त्यांनी माघार घेणे, संपूर्ण चित्रण असलेली कॅसेट भाजपा खासदारांना देण्यास नकार देणे ही सरदेसाई यांची कृती पत्रकारितेस लांछन आणि हा निंद्य प्रकार दडपण्यास सहाय्यभूत ठरली आहे. सत्ता नसताना सोनिया गांधीचे सचिव व्ही. जॉर्ज यांचे गैरप्रकार उजेडात येऊन त्यांची हकालपट्टी होते आणि सत्ता आल्यावर अहमद पटेल निष्कलंक ठरतात आणि या पापास पत्रकार हातभार लावतात, हे दुर्दैव आहे.

अग्रलेख, १७ दिसम्बर २००८ , सोलापुर तरुण भारत.

No comments:

Post a Comment

....


मी एक पत्रकार आहे. आज प्रसारमाध्यमे केवळ व्यावसायीक बनली आहेत; आणि पत्रकारही. परिणामी या राष्ट्रासमोरील समस्या यथार्थपणे समाजासमोर आणल्या जात नाहीत. भारतीय समाज हा हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणानंतरही टिकून राहिला याला कारण आहे या देशाचा जीवनप्रवाह अर्थात हिंदुत्व.

स्वामी विवेकानंद म्हणतात हिन्दुत्व या देशाचा आत्मा आहे. प्राण आहे. हिंदुत्वाची जीवनधारा ज्या भागात कमकुवत झाली तो भाग या भारतवर्षापासून तुटला, हे एक कटु सत्य आहे.

विख्यात जागतिक इतिहासकार अर्नाल्ड तोयान्बी म्हणतात, "जीवनात आव्हानांचे भारी महत्व असते. जीवनात आव्हाने नसतील तर मनुष्य निष्क्रीय बनत जातो आणि शेवटी तो नष्ट होतो. परन्तु व्यक्तीच्या जीवनात आव्हाने असतील तर पुढील दोन पैकी एक गोष्ट होऊ शकते...

i. आव्हाने समजुन घेतली नाही तर त्या आव्हानान्ना बळी पडून नष्ट व्हावे लागते.

किंवा

ii. आव्हाने समजुन घेवून त्यांना प्रतिसाद दिला तर त्यातून मनुष्याचा विकास होतो.''

जी गोष्ट मनुष्याला लागु पड़ते तीच समाजाला आणि राष्ट्रालाही लागु पड़ते.

या राष्ट्राची जीवनधारा खंडीत करण्याचे प्रयत्न परकीय आणि भोगवादी विचारांवर पोसलेल्या स्वाकियांकडून मुजोरपणाने सुरु आहेत. ख्रिस्ती मिशनरी अनेक मार्गाने हिन्दू धर्माचे लचके तोडून येथील सहिष्णु जीवन प्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इस्लामी आतंक हा अतिरेकी, घुसखोरी आणि प्रचंड जननदर या माध्यमातून या राष्ट्राला ग्रासत आहे. हिन्दुन्मधे न्यूनगंड निर्माण करण्याचे प्रयत्न तथाकथित धर्मनिरपेक्षवादी (दुर्) बुद्धिवादी करीत आहेत. त्यामुले या समाजासमोरिल आणि राष्ट्रासमोरील आव्हनांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करीत आहे. आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.

...... सिद्धाराम भै. पाटील