Tuesday, December 16, 2008

निव्वळ धूळफेक


निव्वळ धूळफेक
मुंबईतील 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार जी कारवाई करीत आहे, ती पाहून शरमेने मान खाली जाते. एवढा बुळचटपणा फक्त पराभूत मनोवृत्तीच्या नेत्यातच असतो. देशातील आम जनता ठोस कारवाईची मागणी करीत असताना गेल्या 3 आठवड्यांत आपण काय केले याचे उत्तर शून्य आहे. याउलट पाकिस्तानी जनतेला अभिमान वाटावा असे निर्णय तेथील राज्यकर्ते घेत आहेत. पाकिस्तानबरोबर युद्धाला तातडीने नकार देणारा हा कॉंग्रेस पक्ष लालबहादुर शास्त्री आणि इंदिरा गांधी याचाच कॉंग्रेस पक्ष आहे का, अशी शंका येते. युद्ध नाही असे प्रणव मुखर्जी म्हणत असताना "युद्ध करून बघाच, चोख उत्तर देऊ', असे झरदारी म्हणतात. अशा पाकिस्तानला जोरका किंवा हलकासा झटका बसेल अशी एकही कृती आपल्या सरकारने केलेली नाही. युद्ध नको तर किमान व्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करायला कसलीच आडकाठी नव्हती. कारण ती आंतरराष्ट्रीय सीमा नाही तर फक्त नियंत्रण रेषा आहे. ती ओलांडण्यासाठी ठोस पुरावा होता. जनमत होते. आंतरराष्ट्रीय पाठिंबा होता, पण तेवढेही धाडस आपल्या सरकारमध्ये नव्हते. राजनैतिक संबंध तोडण्याची धमक नाही निदान इस्लामाबादेतील आपल्या उच्चायुक्तास माघारी बोलावणे आणि दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तास परराष्ट्र खात्यात बोलावून झापणे एवढेही करता आले नाही. याउलट पाकिस्तान किती निर्धारपूर्वक निर्णय घेत आहे ते पाहा. यात पाकिस्तानचे कौतुक करण्याचा भाग अजिबात नाही. जगाच्या नकाशातून पाकिस्तान नष्ट व्हावे ही प्रामाणिक इच्छा आहे. मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर एवढे प्रचंड आंतरराष्ट्रीय दडपण आले तरी अमेरिका, ब्रिटन आणि राष्ट्रसंघ या तिघांना कोलवण्याचे धाडस पाकिस्तानने दाखवले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी पाकिस्तान भेटीत ""आता शब्दाची नव्हे तर कृतीची वेळ आहे.'' असे पाकिस्तानी नेत्यांना सांगितले. त्यांची पाठ वळताच पाकिस्तानने कृती केली. ज्या जमात उल दावावर तोंडदेखली बंदी घातली होती ती पण उठवली. राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या आदेशावरून पाकिस्तानने ही बंदी गेल्या आठवड्यात घातली. त्यावेळी आपण आपला मोठा विजय, अशी शेखी मिरवली. आता ही बंदी लगेचच उठवल्यावर आपण काय म्हणणार. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी 15 डिसेंबरला पाकिस्तानी संसदेत "बंदी घालणार नाही' असे जाहीर केले. याचा अर्थच अद्यापपर्यंत बंदी घातली नव्हती. जमातच्या 4 नेत्यांना अटक केल्याचे त्यावेळी जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात हे चौघे नजर कैदेत होते. त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. आता नजरकैदही उठवली आहे. पाकिस्तानातील संदिग्ध अतिरेक्यांची संयुक्त चौकशी करण्याची इच्छा ब्रिटनने व्यक्त केली आहे. लंडन आणि ग्लासगो येथील स्फोटाचे धागेदोरे मिळतील, असे पंतप्रधान ब्राऊन यांना वाटत होते, पण ब्राऊन यांच्या तोंडावर झरदारी यांनी नाही म्हणून उत्तर दिले. आणखी एक उघड गोष्ट म्हणजे कसाबच्या फरीदकोट या गावात एकाही पत्रकाराला प्रवेश मिळत नाही. तसा प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांवर हल्ले झाले. मुंबईतील हल्ल्याचे कर्तेसवर्ते असूनही पाकिस्तान हा उद्धटपणा दाखवत आहे.
याउलट आपण गेल्या 20 दिवसांत दहशतवादाचा सामना करण्यासाठी फेडरल एजन्सी स्थापण्याचा निर्णय घेतला. सध्या सी.बी.आय आणि सी.आर.पी.एफ. अशा फेडरल एजन्सी असताना या तिसऱ्या एजन्सीची गरज काय? पोटा, टाडासारखे कडक कायदे नसताना अशी शंभर पथके स्थापन केली तरी ती निरूपद्रवी ठरणार आहेत. ब्रिटनमध्ये पेट्रीयॉटिक या नावाने एजन्सी आहे. तिच्या कारवाईला कोणी आव्हान देऊ शकत नाही. नव्या फेडरल एजन्सीला एवढे अधिकार देणार का? खुद्द दिल्लीत बटाला हाऊसच्या चकमकीत अतिरेकी मारले गेले, पकडले गेले तरी पोलीस आयुक्त उडवाल आरोपीच्या पिंजऱ्यात जातात आणि अतिरेक्यांची बाजू घेणारा कुलगुरू मिरवतो. ही राजकीय व्यवस्था आहे. निधर्मी देशात धर्म बघूनच कारवाईचा निर्णय होतो, मग ही फेडरल एजन्सी हा नपुंसक निर्णय असून, निव्वळ धूळफेक आहे.

अग्रलेख, १७ दिसम्बर २००८, सोलापुर तरुण भारत

No comments:

Post a Comment

....


मी एक पत्रकार आहे. आज प्रसारमाध्यमे केवळ व्यावसायीक बनली आहेत; आणि पत्रकारही. परिणामी या राष्ट्रासमोरील समस्या यथार्थपणे समाजासमोर आणल्या जात नाहीत. भारतीय समाज हा हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणानंतरही टिकून राहिला याला कारण आहे या देशाचा जीवनप्रवाह अर्थात हिंदुत्व.

स्वामी विवेकानंद म्हणतात हिन्दुत्व या देशाचा आत्मा आहे. प्राण आहे. हिंदुत्वाची जीवनधारा ज्या भागात कमकुवत झाली तो भाग या भारतवर्षापासून तुटला, हे एक कटु सत्य आहे.

विख्यात जागतिक इतिहासकार अर्नाल्ड तोयान्बी म्हणतात, "जीवनात आव्हानांचे भारी महत्व असते. जीवनात आव्हाने नसतील तर मनुष्य निष्क्रीय बनत जातो आणि शेवटी तो नष्ट होतो. परन्तु व्यक्तीच्या जीवनात आव्हाने असतील तर पुढील दोन पैकी एक गोष्ट होऊ शकते...

i. आव्हाने समजुन घेतली नाही तर त्या आव्हानान्ना बळी पडून नष्ट व्हावे लागते.

किंवा

ii. आव्हाने समजुन घेवून त्यांना प्रतिसाद दिला तर त्यातून मनुष्याचा विकास होतो.''

जी गोष्ट मनुष्याला लागु पड़ते तीच समाजाला आणि राष्ट्रालाही लागु पड़ते.

या राष्ट्राची जीवनधारा खंडीत करण्याचे प्रयत्न परकीय आणि भोगवादी विचारांवर पोसलेल्या स्वाकियांकडून मुजोरपणाने सुरु आहेत. ख्रिस्ती मिशनरी अनेक मार्गाने हिन्दू धर्माचे लचके तोडून येथील सहिष्णु जीवन प्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इस्लामी आतंक हा अतिरेकी, घुसखोरी आणि प्रचंड जननदर या माध्यमातून या राष्ट्राला ग्रासत आहे. हिन्दुन्मधे न्यूनगंड निर्माण करण्याचे प्रयत्न तथाकथित धर्मनिरपेक्षवादी (दुर्) बुद्धिवादी करीत आहेत. त्यामुले या समाजासमोरिल आणि राष्ट्रासमोरील आव्हनांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करीत आहे. आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.

...... सिद्धाराम भै. पाटील